विष्णूच्या कृपेने या राशींना माता लक्ष्मीचे आशीर्वादही लाभण्याचे प्रबळ योग आहेत. पंचांगानुसार तीन राशींसाठी धनप्राप्ती व प्रगतीचे हे योग तयार होत आहेत. 2022 या वर्षातील शेवटचे दोन महिने या तीन राशींचे नशीब पालटण्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतात. कोणत्या आहेत या तीन राशी व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे जाणून घेऊयात.
कन्या: कन्या राशीला तुळशीच्या लग्नांनंतर शुभ वार्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. देव उठनी एकादशीपासून कन्या राशीवर भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहू शकतो. यामुळेच धनलाभाचे प्रबळ योग तयार होत आहेत. या शुभ कालावधीत तुमचे वैवाहिक आयुष्य सुधारण्यातही मोठी मदत मिळू शकते. तुमच्या आयुष्यात एक नवी व्यक्ती किंवा गोष्ट येण्याची शक्यता आहे, आपण विवाह इच्छुक असाल तर लग्न जुळण्याच्या दिशेने चार पाऊले पुढे जाता येईल. कोर्टाच्या खटल्यांमध्येही नशीब आपल्या बाजूने राहू शकते.
तूळ: तूळ राशीसाठी शेअर बाजारातून धनप्राप्तीचे संकेत आहेत. तुम्ही यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असेल मात्र तुम्ही नीट तपासणी करून पैसे गुंतवल्यास नफा मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो पण या अडचणी तुमच्या प्रगतीसाठी खूप कामी येतील, उलट या अडचणीतूनच तुमचे ऑफिसमधील महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध सुधारण्यास हा काळ शुभ ठरेल.
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या व्यक्तीला नवी सुरुवात करण्याची संधी आहे. खाजगी किंवा करिअरच्या बाबतही आपण आजवर पळत आलेले नियम झुगारून पुढे जाण्याचा विचार करू शकता, यासाठी आवश्यक ती तयारी करण्याचा हा काळ असणार आहे. तुम्ही नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमचे कष्ट कमी होण्याची पूर्ण शक्यता आहे. वैवाहिक जीवनात कमी अधिक प्रमाणात कौटुंबिक कलह होऊ शकतात मात्र तुमच्या जोडीदाराची साथ लाभल्यास मानसिक शांतीवर परिणाम कमी होऊ शकतो.
टीप :- भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवत आहोत. त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.